शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या कपाशीची जंगली डुकराकडून नासाडी, शासनाकडून उपाययोजना होईल का ? : सौरभ वडते

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात जंगली डुकरांनी हौदोस घातला असून शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत देत येथपर्यंत आल्यावर शेतकऱ्यांचे कपाशीचे पीक हाती आल्यानंतर नुकताच गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात जंगली डुकराकडून उभ्या पिकांची नासाडी करण्यात येत असून जंगली डुकर कपाशीचे झाड बुडा पासून मोडून टाकत असल्याने आता फुटणारे बोंड तसेच राहून जात असल्याने शेतकरी संकटात सापडले असून दिवसभर शेतात राब राब राबणारा शेतकरी या संकटामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा शांतपणे झोपू शकत नाही.अशाप्रकारचे होणारे नुकसान जरी जंगली डुकराकडून होत असले तरी पण या जंगली जनावराकडून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना तारांचे कुंपण द्यायला पाहिजे सोबतच झालेल्या नासाडीचा संबंधित विभागाकडून पाहणी करून ताबडतोब शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी वरूड जहांगीर येथील तरूण शेतकरी सोरभ वडते सह अनेक शेतकऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.