
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांचे कैवारी बनले असून त्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नसल्याने शेतकऱ्यांसाठी एक उपक्रम सुरू केला असून त्यांनी पदयात्रेला सुरवात केली असून त्यांच्या पदयात्रेला शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून पक्षपात बाजूला सारून अनेक तरुण युवक, शेतकरी, महिला भगिनी, अनेक सामाजिक संस्थाचा पाठिंबा मिळाला असून दिनांक 12 जुलै 2025 रोज शनिवारला दिग्रस तालुक्यातील वसंत नगर येथे महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांची भेट घेऊन आपल्या सरपंच संघटनेचा पाठिंबा जाहीर केला हा पाठिंबा सात बारा कोरा या साठी जाहीर केला असून पाठिंबा जाहीर करण्यामागची भुमिका स्पष्ट केली सोबतच पदयात्रेत सहभाग घेतला. येत्या 14 तारखेला श्रीक्षेत्र माहूर जवळील महागाव तालुक्यातील अंबोडा या गावात पदयात्रेच्या समारोपीय सभेत सरपंच बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे, महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कराळे, विदर्भ सल्लागार अँड.देवा पाचभाई, विदर्भ सरचिटणीस सुधीर जवादे, विदर्भ सल्लागार लिना तुरकर यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर, महिला अध्यक्ष सविता जाधव, उमेश राठोड, अविनाश रोकडे व समस्त जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी बंधू भगिनींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
