
सहसंपादक : रामभाऊ भोयर
प्रशासकीय कार्यालय परिसर
येथे आज न्याय प्रलंबित मागण्यांसाठी राळेगाव शहर विकास संघर्ष समिती व व बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठे यश आले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याने, आंदोलकांनी आनंदाची उधळण करत यशस्वी सांगता केली. या मुळे उद्या दि.10 फेब्रु.पासून सुरू होणारे आमरण आंदोलन देखील संस्थगीत करण्यात आले .
आज सकाळी उपविभागीय अधिकारी,तहसीलदार आणि आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली . यात प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देवून मागण्या मार्गी लावण्याचे ठोस आस्वासनदिले ., तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र, आज वेगवेगळ्या मागणी च्या पूर्तता बाबत प्रत्यक्ष कालावधी देण्यात आला .
शासन निर्णयाची प्रत आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक सादर केल्याने आंदोलकांचे समाधान झाले.
प्रमुख मान्य झालेल्या मागण्या: 2011 च्या आधीपासून जे नागरिक राळेगाव अतिक्रमण धारक आहे त्यांना पंधरा दिवसा नंतर घरकुलाचे अर्ज करण्यास सुरुवात होईल. ज्या अतिक्रमण धारकांचे पट्ट्यांचे मोजमाप झाले आहे अशा सर्व अतिक्रमण धारकांचे पट्टे येत्या तीन महिन्यात मिळतील. असे गिरीश पारवेकर त्याचबरोबर तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसात विनाशुल्क रेती मिळेल अशा आश्वासन राळेगाव तहसीलदार अमित भोईटे असे ठोस आश्वासन देण्यात आले .
विजयाचा जल्लोष
मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच आंदोलनस्थळी एकच आनंद निर्माण झाला .”अन्यायाविरुद्धचा हा लढा एकजुटीमुळेच यशस्वी झाला,” अशी भावना आंदोलन समितीच्या शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी व्यक्त केली. आंदोलकांनी प्रशासनाचे आभार मानले, मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे.
दुपारी उशिरा उप विभागीय अधिकारी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना लिंबू सरबत पाजले आणि उपोषण सोडवले. या यशस्वी सांगतेमुळे शहरातील गोर _गरीब,महिला भगिनी व सर्वसामान्य माणूस यशस्वी ठरल्याची सार्वत्रिक भावना आहे .
