
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी दिनांक 23/2/2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यात सोनुर्ली आणि एकलाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोनुर्ली आणि एकलाऱ्यांच्या शेतकऱ्यांनी 24/22026 रोजी राळेगाव तहसीलदार यांना शेतीतील पिकांचे नुकसान झाल्याचे निवेदन दिले असून शेतीतील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक यांना भ्रमणध्वनीवरून दिली असता कुणीही झालेले नुकसान पाहण्यासाठी आले नसल्याचे निवेदनातून म्हटले असून गहू, हरभरा, ज्वारी,तुर तीळ, मक्का ,मुंग इत्यादी शेती मालाचे शेतकऱ्यांच्या हातातून उत्पन्न निघून गेले असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.करीता संबंधित विभागाने मोका पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी खालील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहेत अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
