मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या नेतृत्वात अतिवृष्टी ,पुरपीडितांच्या समस्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

▪️दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता


▪️ स्थळ – टिळक स्मारक मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

प्रमुख मागण्या


१) जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे पंचनामे न करता सरसकट तात्काळ मदत देण्यात यावी.
२) अतिवृष्टीमुळे शहरी भागात पडलेल्या घरांचे व गृहउपयोगी वस्तुची नुकसान भरपाई तात्काळ देणे बाबत
३) पूरग्रस्त भागातील लोकांच्या घरांची झालेली पडझड व वाहून गेलेल्या साहित्यांचे तात्काळ भरपाई देण्यात यावी
या सह अन्य मागण्यांना घेउन जनतेच्या हितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.