सरसकट मदत देण्याची गरज, पण लक्षात कोण घेतो
( अवकाळी ने कपाशी, तूर व रब्बी पिकांचे नुकसान )

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या खरीब व रब्बी दोन्ही हंगामातील पिकचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आज (दी 6 डिसेंबर ) देखील राळेगाव तालुक्यात ढगाळी वातावरण असून पावसाची शक्यता आहे.कापूस, तूर, फळबाग, भाजीपाला वर्गीय पिकाची प्रचंड नासाडी झाली आहे आदिच असमानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे पिके सावरली असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसाने पाणी फेरल्या गेले त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाची सर्वेक्षण करून राज्य शासनाने सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसे सुतोवाच केले असले तरी पंचनामेदी सोपस्कार होऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणार कधी हा प्रश्न आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनात या बाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या नशीबी कोणते संकट कधी येईल याचा काही नेम नाही गत दोन वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी महापूराच्या संकटाची अनुभूती घेतली यावर्षी सुध्दा हजारो हेक्टर जमीनीचे पिके पाण्याखाली सापडली असे असताना हि शेतकऱ्यांनी खचून न जाता मोठ्या मेहनतीने आपली पिके चांगले उत्पन्न होईल अशा अवस्थेत आनली . बोंडातून कापूस बाहेर निघताच शुभ्र पांढरे रानाचे दृश्य ,त्यात आंतर पिक म्हणून तुरीच्या ओळी सोनेरी रंगाच्या फुलांनी बहरल्या होत्या, फळबागेतील लोंबत्या फळाचे दृश्य आकर्षीत दिसत होते, भाजीपाल्यावर हिरवा शालूचे पा्गरून असल्याचे चित्र दिसून येत होते,हे नैसर्गिक सौंदर्य बघून यावर्षी समाधान कारक उत्पन्न होण्याचे स्वप्न शेतकऱ्यांच्या डोळ्यात होते मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न एका क्षणात भंग झाले कापूस ओलाचिंब होऊन लोंबू लागला पांढरा रंग काळपट झाला, पावसाने सम्पूर्ण पराटीचे व बोंडे काळपट झाली, तुरीचा सोनेरी रंग उडून गेला सम्पूर्ण बार पावसाने खाली पडला, तिच अवस्था फळबाग व भाजीपाला वर्गीय पिकाची सुध्दा झाली आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर पुन्हा संकटाचे ओझे आले मात्र याचे कुणालाच सोयरसुतक नसल्याचे शेतकर्यांना वाटू लागले तालुक्यात ढिगाने असलेल्या कोणत्याच पुढार्याने शेतकऱ्यांची सादि विचारना केली नाही. लग्न समारंभ तेरव्हित हजेरी लावणारे नेते आता गेले तरी कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


अवकाळी पावसाने कापूस, तूर व रब्बी पिकांचे नुकसान झाले. सध्या देखील विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ढगाळ वातावरण व हलक्या सरी कोसळत आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. शेतमालाला योग्य बाजारभाव नाही. शेतकरी संकटात आहे. अशा वेळी तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायला हवी. शासन घोषणा करते पण प्रत्यक्षात ठोस मदत मिळत नाही. विमा कपंनी शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. शेतकरी आत्महत्याचा प्रश्न बिकट बनला असताना शेती फायदयाची व्हावी या साठी महत्वाकंक्षी धोरणत्मक निर्णय घेतल्या गेले पाहिजे.


-जानराव गिरी
उपाध्यक्ष न. प. राळेगाव