
सहसंपादक : रामभाऊ भोयर
: राळेगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या थांबता थांबेना दिनांक १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सावित्री पिंपरी येथील दिलीप गोविंदराव पंढरपूरे वय ४७ यांनी यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. त्यांच्याजवळ दोन ते तीन एकर शेती होती व काही ठेक्याने करत होते परंतु सतत नापिकी व यावर्षी सतत पावसाने शेतीचे पूर्णपणे नुकसान झाल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला हाअंगावर वाढलेला कर्जाचा बोजा सहन न झाल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली त्यांच्या मागे तीन मुली व पत्नी असा आप्त परिवार आहे तरी शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी जेणेकरून त्यांच्या परिवारास मदत होईल असे असे सावित्री पिंपरी परिसरात बोलले जात आहे
