
प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी.
अलीकडे सोशल मीडियाचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला असून काही विकृत बुद्धीचे समाजकंटक मीडियाचा गैरवापर करून दोन गटात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस, व्हिडिओ, फोटो, अपलोड करीत द्वेष भावना निर्माण करतात. अशा व्यक्तीवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. असा सज्जड व कडक इशारा बिटरगाव (बू )पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी दिला आहे.
समाजातील बहुतांशी व्यक्ती गुण्यागोविंदाने नांदत असतात मात्र काही विकृत बुद्धीचे समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन गटात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे वागतात यात काही महाविद्यालयीन विद्यार्थी असतात यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पालकांनी जातीय तेढ निर्माण करतील अशा लोकांपासून मुलांना दूर ठेवावे समाज माध्यमांचा चुकीचा वापर केल्यास दोन समाजात भांडण तंटे होऊन जातीय तेढ निर्माण होऊन गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे मुलाचे भविष्य खराब होऊ शकते याची काळजी सुद्धा युवकांनी घ्यायला पाहिजे. असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी केले आहे. पोलीस प्रशासन व सायबर क्राईम विभाग, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर. या गोष्टीकडे पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. शहरात शांततामय वातावरण आहे. मात्र कोणी समाजकंटक शांततामय वातावरणात खराब करून दोन गटात जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी दिला आहे.
