सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहरातील गोर _गरीब , सर्वसामान्य नागरिक , महिलांभगिनींचा आजही हक्काच्या घरासाठी संघर्ष सुरू आहे .शासन निर्णय असताना त्यांना घरकुल चा लाभ मिळत नाही ,या बाबत वारंवार मागणी करूनही कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने राळेगावकर नागरिक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांच्या नेतृत्वात एकत्र आले .अतिक्रमित जागेवरील पट्टे तातडीने देण्याच्या मुख्य मागणीसह इतर जनहित मागण्यांकरिता तहसील कार्यालय राळेगाव येथे 9 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार आहे .
व्यापक जनहिताच्या न्याय मागण्याची दखल घेण्यात येत नसल्याने 9 फेब्रु.धरणे आंदोलन व 10फेब्रु .पासून आमरण उपोषण चा इशारा देण्यात आला .घरकुल अतिक्रमणे नियमित करणेबाबत शासन निर्णय क्र. जमीन 2025/प्रक 236/ज_1, दि.1 ऑगस्ट 2025 , प्रधानमंत्री आवास योजना शहरी, 2.0 अंमलबजावणी, शासन निर्णय नपप्रस/प्रधानमंत्री आवास योजना 2.0/2024/का./07अ /8589दि.16 डिसेंबर 2024 व सर्वांसाठी घरे 2022 शासन निर्णय क्रमांक संकीर्ण_2019/प्र. क्र.15/नवी _26दि. 6 मार्च 2019, हे स्वयंस्पष्ट शासनदेश असताना राळेगाव येथील घरकुल पासून शहरवासी वंचित आहे .
अतिक्रमण धारकांना कायम पट्टे मिळालेले नाहीत, त्यामुळे त्यांचे न्याय हक्क डावलण्यात येत आहे. याबाबत वारंवार लेखी तोंडी मागणी करण्यात आली पण त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .व्यापक जनहित लक्षात घेऊन संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे नमूद असून विविध न्याय मागण्या करण्यात आल्या .
यात वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार रहिवासी असणाऱ्या राळेगाव शहरातील अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना कायम रहिवासी पट्टे देण्यात यावे.
घरकुला पासून वंचित असणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिक ,महिलांना घरकुल चा लाभ देण्यात यावा.
नवीन घरकुल चे अर्ज स्वीकारण्यात यावे.
घरकुल लाभार्थ्यांना दहा ब्रास रेती मोफत देण्यात यावी.
इत्यादी मागण्या करण्यात आल्या . जनतेच्या मनात असलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी 9 फेब्रुवारी पासून उपविभागीय कार्यालय समोर धरणे आंदोलन व 10 फेब्रुवारी 2026 पासून आमरण उपोषण करण्यात येईल , समस्या ,प्रश्न तातडीने सोडवण्यात आला नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला मागण्यांची पूर्तता करावी अशी विनंती करण्यात आली आहे .या आंदोलनाच्या निमित्ताने जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फुटल्याची चर्चा राळेगाव शहरात व्यक्त होताना दिसते . संविधानिक मार्गाने हे आंदोलन होईल या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी ,महिलांनी ,युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
