
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव दिनांक २४/ २/ २०२६ तालुक्यात दुपारी दोन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडासह पावसाने सुरुवात केली असताना चंद्रभान पाचारे यांच्या शेतात अचानक वीज कोसळली आणि पाच जण जखमी झाले असून या दोन जण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे चंद्रभान नारायण पचारे वय 45 वर्ष गणेश नाने वय 55 वर्ष कात्री तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हे दोघे शेतात काम करत होते व विमल पदीले वय 45 वर्षे झरगड सुनिता राऊत वय 32 वर्ष वंदना पदिले वय 40 वर्ष झरगड या तीन महिला कापूस वेचणी करीत होत्या मात्र दुपारी दोन वाजता च्या वादळीवाळा व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि सुरुवात होताच शेतातील असलेले हे पाच जण घराकडे जाण्यासाठी निघाले मात्र शेतातून निघताच त्यांच्याजवळ अचानक वीज कोसळली व यात पाचही जण जखमी झाले ही माहिती शेतातील नागरिकांना मिळताच त्यांनी गावातील नागरिकांना कळविले असता नागरिकांनी त्यांच्याकडे वेळीच धाव घेत व या पाचही जणांना शेतातून उचलून आणून ते त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता राळेगाव येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले भिम टायगर सेनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत राडे हे 24 तासापासून त्यांच्याजवळ उपस्थित आहे दवाखान्यामध्ये योग्य उपचार होत नसल्याचे त्यांनी सांगितले या गंभीरघटनेची दखल घेऊन जखमींना व्यवस्थित उपचार करावे असे श्रीकांत राडे यांनी व्यक्त केले आहे
