
.
(प्रतिनिधी) शेख रमजान
देशात संविधानिक मूलभूत अधिकार,धार्मिक स्वातंत्र्य,सामाजिक न्याय अबाधित रहावा.मुस्लिमांवर होणारे अत्याचार थांबविण्यात यावे.ह्यासाठी भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रिय अध्यक्ष वामन मेश्राम,राष्ट्रिय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्ष इंजि.सैय्यद मकसूद, राष्ट्रिय प्रभारी चांद मोहम्मद यांच्या आवाहनानंतर राष्ट्रिय मुस्लिम मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा यांचे संयुक्त विद्यमाने,
आज भारतातील 31 राज्य 650 जिल्हे आणि 5000 तालुक्यांमध्ये एकाचवेळी निवेदन देण्यात आले.
या अंतर्गत उमरखेड तालुक्यातील ढानकी येथे भारत मुक्ती मोर्चा चे अमोल पाटील,प्रकाश कांबळे, राष्ट्रिय मुस्लिम मोर्चा चे शेख जब्बारभाई यांच्या नेतृत्वात,
असंविधानिक कायदे वापस घेण्यात यावेत,धार्मिक स्वातंत्र्य कलम 25,26,27,28,29 चे पालन सुनिश्चित व्हावे,समूह हत्या आणि खोट्या गोतस्करीच्या नावावर निष्पाप लोकांच्या हत्या आणि अत्याचार थांबविण्यात याव्यात,खोट्या आरोपांच्या नावावर अटक केलेल्या निरपराध मुस्लिम,ईसाई तरुणांना तसेच उलेमांना सोडण्यात यावे.
भारतातील सर्व वर्गांची जातीनिहाय जनगणना करून संख्येच्या प्रमाणात सर्वांना भागीदारी मिळावी.गोपाल सिंह,सच्चर,मिश्रा,कुंडू कमिशन च्या शिफारशींचे पालन करण्यात यावे.धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले तत्काळ रोखण्यात यावे,कम्युनल व्हायलेंस प्रीवेंशन ऍक्ट तात्काळ लागु करण्यात यावा.
यांसह विविध मागण्यांसाठी ढानकी पोलिस स्टेशन चे ठाणेदार पांडुरंगजी शिंदे यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपतींना हे निवेदन पाठविण्यात आले.
निष्पाप,निरपराध नागरिकांवर अन्याय,अत्याचार झाल्यास संविधानिक मार्गाने राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
यावेळी भारत मुक्ती मोर्चा चे प्रकाश कांबळे, राष्ट्रिय मुस्लिम मोर्चा चे मुजाहिदखान,शेख सफदर, इनायतभाई, इरफान,शाहरुख शेख, बुद्धिस्ट इंटरनेशन नेटवर्क चे मल्हारी दवणे,लहुजी क्रांती मोर्चा चे दिलीप कलाले,पुंडलिक तलवारे, छत्रपती क्रांती सेनेचे कृष्णा पाटील चंद्रवंशी,मुनव्वरखान आदी उपस्थित होते.
या देशव्यापी आंदोलनामुळे संविधानिक अधिकार,धार्मिक स्वातंत्र्य,सामाजिक न्याय आणि राष्ट्रिय एकात्मतेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रिय पातळीवर चर्चेचा विषय ठरला असून अठरापगड जातीतील बांधवांनी मुस्लिम बांधवांच्या संविधानिक अधिकारांचा समर्थनात दिलेल्या ह्या निवेदनाची विविध सामाजिक आणि राजकीय वर्तुळात व्यापक चर्चा सुरू असून एकतेचा संदेश देणाऱ्या ह्या आंदोलनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
