कुही शहरात घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगाची नागरिकांमध्ये भीती कुही शहरातील साफ़ सफाई टेंडर चालू करा अन्यथा नगर पंचायत तर्फे साफ सफाई चालू करा

प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे, की 12 ऑगस्ट पर्यंत काम चालू करण्यात यावा अन्यथा 13 आगष्ठ पासून बे मुदत आंदोलन करण्यात येईल अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नागपूर उपजिल्हाप्रमुख संजय अतकरी यांच्या कडून करण्यात येत आहे.

“”देशपातळीपासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून शहर स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते.””””

कुही : ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडूनआवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, कुही शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता रोखता डेंग्यू ,व अनेक प्रकारच्या दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.

स्वच्छतेवर किती खर्च होतो? मात्र, कुही शहरात निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.
,,,,,,शासनाच्या निधीचा काय उपयोग सध्या करोना सारख्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नागरिक कोरोना पासून बचावाकरिता सांगण्यात येणाऱ्या उपायांचे नियोजन गांभिर्याने करण्यावर भर देत आहेत. मात्र कोरोनाला रोखण्याकरिता नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना या कोरोनाला रोखण्यास फायदेशीर ठरतीलही. मात्र हेच होत असताना शहरातील असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे शहरवासियांना भोगावे लागतील. तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणाऱ्या निधीचा काय उपयोग? अन येणारा निधी स्वच्छतेच्या उपाययोजनांवर खर्च न करता तो कोठे खर्ची होतो? हे शहराच्या अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या भितीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे.शासनाने ठोस पावले उचलावीत तेव्हा नागरिक शासन-प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशाप्रकारे नागरिकांच्या जिवित्वाशी खेळण्याच्या चालविलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? अन या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनानेच ठोस अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी
न प ने तातडीने शहरात सर्वत्र फवारणी करावी जगोजागी साचून पडलेला कचऱयाचे ढीग त्वरित उचलून नाल्याची सफाई युद्धपातळीवर करावी अशी मागणी चे निवेदन मा.ना.बच्चू भाऊ कडू,महाराष्ट्र राज्य मंत्री ,जिल्हा धिकारी साहेब नागपूर,कामगार आयुक्त साहेब, उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील, कुही, मा.आ.राजू भाऊ पारवे, मा.तहसीलदार बाबाराव तीनघसे साहेब,न पं मुख्याधिकारी , यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे नागपूर उपजिल्हाप्रमुख संजय अतकरी यांनी न प ला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनाची 12 //8/ 2021 प्रयत्न दखल घेतली नाही तर दि 13 //8/2021 आंदोलन चालू करण्यात येईल, व मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे करण्यात येणार नाही या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रोशन बांते, शेषराव दुधपचारे, मोहन धोटे, अजय। बांते, आशिष लांजेवार, हीवराज निलगुलकर, राम चाचरकर, गणेश भोयर, राहुल लांजेवार, प्रल्लाद देशमुख, मनोज लामसे, कवडू मांडरे, गणेश लामसे, सचिन धोटे, हिमांशू धोटे, पंकज खराबे , अमोल दुधपचारे, ईश्वर हटवार, अमोल करारे राजू करारे गोलू मोहंकार, राम शेंदरे, कीर्तिदाश हटवार, ईत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागणी। ,,सर्वसामान्यांमधून होत आहे.