राळेगाव तालुक्यातील सरई येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बघून मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

आज संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण शेतकरी आणि त्यांचं मेन साधन असलेला बैल यांना सजवून साजरा करण्याकरिता आपल्या बैलांना आंघोळ घालण्याकरिता सरई गावातील दोन शेतकरी तलावामध्ये गेले असता तेथील तलावात बुडून त्यांचा अंत झाला सर्वत्र बैलपोळा हा मोठा उत्सव साजरा होत आहे, मात्र राळेगाव तालुक्यातील सरई गावातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे, गावातील दोन् शेतकरी बैल धुण्या करिता गाव लगतं असलेल्या तलावात गेले व बैल धुण्याच्या नादात ही घटना झाल्याने सर्वत्र राळेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, सरई गावातले दोघेही आपले बैल धुण्यासाठी गावालगत तलावात गेले असता, गजानन राजूरकर व रावबा टेकाम यांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी समजत गावातील सर्व नागरिक तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी वर्ग व महसूल विभाग घटनास्थळी पोहोचून यांचा पंचनामा करण्यात आलेला आहे, पुढील तपास राळेगाव येथील पोलीस स्टेशन करीत आहे.