

भद्रावती तालुक्यातील माजरी येथे वॉर्ड क्रमांक पाच मधील पुलावर मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे . या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करताना चुकून खड्डा न दिसल्यास मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा सवाल माजरी गावातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
