
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
पाच दशकांपासून जनतेच्या प्रश्नांचा प्रभावी आवाज बनलेले साप्ताहिक आत्मबल दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर साप्ताहिक कार्यालयात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार मोहन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून महेश शेंडे, डॉ. कैलास वर्मा आणि राजू रोहणकर या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी मोहन देशमुख यांनी आत्मबलच्या यशस्वी वाटचालीवर भाष्य केले. पत्रकार डॉ. कैलास वर्मा यांनी पत्रकारिता क्षेत्रासमोरील आजच्या आव्हानांवर विचार मांडले, तर राजू रोहणकर यांनी संपादक मंगेश राऊत व राऊत मित्रपरिवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
प्रकाशन सोहळ्यास मोहनजी देशमुख, राजूभाऊ रोहनकर, महेशभाऊ शेंडे, डॉ. कैलासजी वर्मा, अशोकराव पिंपरे, फिरोजभाऊ लाखाणी, मनोहर बोभाटे, किरणभाऊ हांडे, प्रकाशभाऊ खुडसंगे, संजयभाऊ दुरबुडे आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंदभाऊ तामगाडगे, लायन्स बहुद्देशीय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सय्यद लियाकतभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ कन्नाके, नगरसेवक बाळासाहेब धुमाळ, मधुकरभाऊ राजूरकर, माजी नगरसेवक प्रदीप लोहकरे, अफसरअली सय्यद, नितीनभाऊ कोमेरवार, नारायणभाऊ धानोरकर, अनिलभाऊ गलांडे, रुपेश कोठारे, मनोज पेंदोर, राहुल बहाळे, प्रवीण काकडे, प्रकाश देवकर, सुमित राऊत, अंकुश वड्डे, आयुष राऊत, महादेवराव ससाने यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. प्रकाशन सोहळ्याचे संचालन व आभारप्रदर्शन मनीषभाऊ काळे यांनी केले.
