
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आयटकसह केद्रीय कामगार संघटनांनी दिलेल्या देशव्यापी संपाचे हाकेनुसार स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथुन निघालेला मोर्चा जिल्हा परिषद मार्गे,संविधान चौक ,दत्त चौक, नेताजी मार्केट , पाच कंदली चौकातुन, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळा जवळून, महादेव मंदिरमार्गे मार्गक्रमण करत कामगार विरोधी धोरणाचे विरोधात घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष केंद्रित करत मोर्चा आयटक च्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. केंद्र सरकार व्दारे लागु श्रमिक विरोधी ४ श्रम सहीता लागु करणे संबंधी दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक जारी केलेली अधिसुचना रद्द करा.यासह इतरही मागण्यांना घेऊन आयटक सह केंद्रीय कामगार संघटनांनी आज दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसाचा पुकारलेल्या लाक्षणिक संपात शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन व अंशकालीन स्त्री -परिचर संघटना त्यांच्या मागण्यांना घेऊन सहभागी होत्या. सातत्याने शासनाकडे (स्वयंपाकी-मदतनीस) म्हणून नाही; अंशकालीन स्त्री -परिचर म्हणून नाही; तर आम्हाला कामगार समजुन कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन द्यावे अशी मागणी करीत आलो आहोत.परंतू शासन या कडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी-मदतनीस यांच्या मानधनात दरमहा रू.१०००/-( एक हजार) मानधन वाढ देण्याचे मान्य करून सुद्धा शासनाने पुर्तता केलेली नाही. त्याच प्रमाणे आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री -परिचर यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे त्याचीही अमंलबजावणी नाही शासनाने कामगारांच्या हिताचे कामगार कायदे मोडून त्यांना वेठबिगारी सारखे जिवन जगायला भाग पाडु नये.मानविय दुष्टीने विचार करून सर्व श्रेत्रातील कामगारांना किमान वेतन द्यावे. अशी आम्ही मागणी करीत आहोत. सध्या स्वयंपाकी मदतनीस यांना केंद्र सरकार दरमहा रू.६००/- व राज्य सरकार रू.१९००/- असे एकुण रू.२५००/- मानधन देत आहे. तसेच अंशकालीन स्त्री -परिचर यांना केंद्र सरकार दरमहा रू.१००/- तर राज्य सरकार रू.२९००/- असे एकुण रू. ३००० /-देत आहे या जिवघेण्या महागाईत येवढ्या तुटपुंज्या मानधनात कसे जगायचे हा आमच्या समोर यक्ष प्रश्न आहे. तेव्हा केंद्र व राज्य शासनाने श्रमिक विरोधी ४ श्रम सहीता रद्द कराव्या, श्रमीकांना सार्वभौमिक सामाजिक सुरक्षा प्रदान करा,अंघीटीत कामगारांना किमान वेतन रू.२६०००/- द्या , पुर्वीपासुनचे कामगार कायदे कायम ठेवा या मुख्य मागण्या सह इतरही मागण्याचे निवेदन पंतप्रधान ,नई दिल्ली व मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य मुंबई यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे. मागण्या १) दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी काढलेल्या आक्रोश मोर्चा नागपुर हिवाळी अधिवेशना दरम्यान दिलेल्या आश्वसनाप्रमाणे दरमहा रू.१०००/- मानधनवाढ बाबत शासन निर्णय १ एप्रिल २०२४ पासुन लागु करुन शासन निर्णय काढावा.२) अंशकालीन स्त्री -परिचर व स्वंयपाकी / मदतनिस यांना दरमहा किमान वेतन रू.२६०००/- द्या. व त्यांना सामाजिक सुरक्षा लागु करा.३) स्वंयपाकी /मदतनिस यांना १० महिन्याऐवजी १२ महिन्याचे मानधन द्या.४) स्वयंपाकी / मदतनिस यांना दरवर्षी दोन महिन्याचे मानधन दिवाळी/ भाऊबीज भेट म्हणुन बोनस द्या.५) स्वंयपाकी / मदतनिस यांना गणवेश व ओळखपत्र द्या.६) स्थानिक व्यवस्थापन समितीने परस्पर कामावरुन कमी केलेल्या स्वंयपाकी मदतनिस यांना परत कामावर घ्या.७) केंद्र सरकारने सन २०११ पासुन मानधनवाढीत वाढ केलेली नसुन याबाबत केंद्र सरकारला मानधनवाढी बाबतचा प्रस्ताव पाठवा.८) स्वंयपाकी / मदतनिस यांना दरमहा मानधन वेळेत ०१ तारखेला द्या.९) इंधन व भाजीपाला बिले वेळेत मिळावे.१०) सर्व कामगारांना समान काम समान वेतन द्या. यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे, विजय ठाकरे संजय भालेराव जिल्हाध्यक्ष कॉ.विलास ससाने, जिल्हा सचिव,मोहन आडे, गोपाल घोडाम , शंकरराव कदम, नामदेव ढोरे, कैलास कांबळे, सुरेखा कोमेजवार , लीयाकत बि शेख, संजना भोंगळे, वर्षा धंदरे, मंगला अर्के, कल्पना सोयाम, प्रशांत लोहकरे, सुरेखा चौधरी , प्रजापती दवने, पंचशीला कांबळे, सुवर्णा विठेवार, लता सवाईमुल, जयश्री पांचगे ,गीता फुसनाके, प्रविण सोनटक्के, प्रेमीला खंडरे, साईनाथ बल्की, संगीता कवाळे, पु्ष्पा तामगाडगे ,सुरेश गायकवाड, सुखदेव धुर्वे, अमीत सावरकर, विजय आडे, अरूणा गजभीये,
सुरेखा पांडे, रूखमीणा बंम, सुष्मा बैस, करूणा डांगे, सविता गोरे,सुमीता वाठोरे, छाया बोडगे,रब्बाना शेख, दिपाली खानझोडे, मंगला जांभळे, शारदा ढोकलवाड, उषा नागोसे, मीना पाटील,चंदा चौधरी,प्रणीता घोडाम, अश्विनी आंबेडकर, नंदा राठोड, मंदा भोयर, रंजना लोनबले, जया कांबळे, तैमुन ,वणीता कांबळे, पुष्पा निकोडे, शारदा उन्नमेय, सुनिता वड्डे, सुनिता राऊत, सिमा चौधरी,गोकुळा काळे, शोभा नांद, वैशाली परसोडे, संगीता मोरे,संजीदा खान, माया किनाके, परशुराम मेश्राम, मंगला मेश्राम, ललीता तीजारे, बाजीराव गायकवाड, रामधन जाधव, गायत्री गुल्हाने, मंजुषा तायकोटे, मेहरबानो,फातेमाबी, अनिता डेहनकर, संध्या जांभुरे, प्रिती चव्हाण, अनुसया नागोशे, तुळसा मेशकर, सुरेखा कुंमरे, निर्मला गेडेकार, सुकेशनी घायवान,विद्या टेकाम, प्रतीभा मेश्राम, रंजना मडावी, रंजना टेकाम , सुवर्णा कंगाले, नंदाताई आत्राम, कुमूदबाई मडावी, अजाबराव शेंडे, शोभा चाफले, कुसुम चाफले, सिमा देठे, माया कोटेजावरे, रेखा दाबेकर, पार्वताबाई राऊत, सुमीत्रा मसराम, सुशमा सोनवणे,सुंद्रर साक्रापुरे, अनुसया नागोशे, सविता किन्नाके, उषा नेहारे,गीता फुसनाके, मंगला परचाके, पल्लवी वसाळे,ळ सिंदुबाई तीवसे, मीराबाई पिंपरे, मंजु क्षीरसागर,सिमा मेश्राम, संजना भोंगळे, राजु भोंगळे, वर्षा धंदरे, सिंधू मांढरे, मंजुषा वनकर, प्रतीभा कांबळे, मंदा किन्नाके,गीता गेडाम, शालु वाघाडे, सुनिता कडु, वंदना मेश्राम, बंडु वनकर, सुवर्णा कुकडे, निर्मला टेकाम, प्रतीभा मेश्राम, हर्षदीप मेश्राम, ,अंनता बोकडे,रीना पुरी, वाणीता जाधव,योगीता ठाकरे, संगीता कवाळे,पंचशीला कांबळे,सुचीता पाईकराव,वंदना पारधी, अनिता जोगदंड, वर्षा राठोड, नर्मदा मरापे,योगीता मंदावार, अर्चना मेश्राम, वंदना अगलधरे, आश्वीनी भोयर, अरूणा पीलावन यांनी केले
