
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव वर्धा नदी पात्रातून जलशुद्धीकरण केंद्रावर जाणारी पाईपलाईन आदिवासी स्मशानभूमी व वर्धा वळन रस्ता लगत गेल्या पाच वर्षापासून फुटलेली आहे संबंधितांना याची माहिती आहे. पाण्याची नासाडी सुरू आहे वर्धा वळण रस्ता पॉईंट जवळ त्रिमूर्ती मंगलम कडून येणारे सांडपाणी व वर्धा नदी पाईपलाईनचे जलशुद्धीकरण केंद्राला जाणारे पाणी याची गटारगंगा बनल्यामुळे व या गटार गंगेतच पाईपलाईन फुटून असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे ती फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर प्रमुख शंकर गायधने, महिला आघाडीच्या शहर संघटिका पार्वता बाई मुखरे, शहर संघटक योगेश मलोंढे, उपशहर प्रमुख श्रीकांत कोदाणे, देवराव नाखले, सुनिल क्षिरसागर,महादेव मुखरे, धनराज श्रीरामे, इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांना निवेदन देण्यात आले.
वर्धा बेसिन मधून जलशुद्धीकरण केंद्रात जाणारी पाईप लाईन दोन-तीन ठिकाणी अनेक दिवसापासून फुटून असल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे
वर्धा वळण रस्ता पॉईंट जवळ त्रिमूर्ती मंगलम कडून येणारे सांडपाणी व वर्धा नदी पाईपलाईनचे जलशुद्धीकरण केंद्राला जाणारे पाणी यांची गटार गंगा बनली आहे ही गटारगंगा टर्निंग पॉईंट वडकी रोड कडे वाहत आहे. गळती ठिकाणी पाण्याचा दाब कमी झाल्यावर सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे ही बाब शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे तीन महिन्यापूर्वी इंदूर शहरात दूषित पाण्यामुळे मनुष्यहानी झाली होती नगरपंचायत कडून पाईपलाईन दुरुस्तीचे कंत्राट वर्धेच्या फर्म कडे असल्याचे सांगितले जाते पण प्रत्यक्षात नगरपंचायत चे नियमित कर्मचारी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना दिसते या कंत्राटाचे काय गौड बंगाल आहे याची चौकशी करून कार्यवाही करणे व फुटलेली पाईप लाईन विना विलंब दुरुस्त करणे जेणेकरून उन्हाळ्यात पाण्याची बचत होईल याची दखल घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेनेकडून देण्यात आले. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला निवेदनावर शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक सुधाकर शिखरे, प्रभाकर धोटे, किशोर नित, महादेव लांबाडे इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत तर देवानंद पांडव, रोशन उताणे, वैभव दुधे, मनोज राऊत, अंकुश गेडाम राजु किन्हेकार, शंतनू सहारे इत्यादींची उपस्थिती होती.
