वाहतूकीचे नियम पाळा व जीवन सांभाळा – ए.पी.आय. संजय अत्राम

आर.सी.सी.पी.यल. – मुकुटबन , ऍम पि बिरला ग्रुप, वाहतूक शाखा वणी आणि रा.से.यो. विभाग लोकमान्य टिळक महाविद्यालय,वणी यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता “सुरक्षा सप्ताह कार्यशाळा” चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा समाजशास्त्र विभाग प्रमुख व रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.निलीमा दवणे तर प्रमुख पाहूणे लोजिस्टिक्स सेप्टी मँनेजर श्री.राजकूमार हिरनखेडे,
श्री.प्रकाश पंकज (सीनियर एक्सक्यूटिव सेफ्टी) आर सी सी पी यल – मुकुटबन ( ऍम पि बिरला ग्रुप) ,वाहतूक नियत्रंक ए.पी.आय.श्री.संजय आत्राम विचार मंचावर उपस्थित होते. सदर कार्यशाळा घेण्याचा उद्देश स्पष्ट करतांना श्री. राजकुमार हरिनखेडे माहीती देताना म्हणाले की, सरकारी आकडेनुसार, २०२१ मध्ये संपूर्ण भारतात एकूण ४,०३,११६ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे.
• २०२१ मध्ये ४,०३,११६ रस्ते अपघातांमुळे १,५५,६२२ मृत्यू आणि ३,७१,८८४ लोक जखमी झाले. ५५.९% रस्ते अपघात हे ‘अतिवेगाने’ ८७,०५० मृत्यू झाले आहे.आकडेवारीनुसार, रस्ते अपघातमधे ४४.५% बळी हे २ चाकी वाहतूक आणि १४.६% ट्रक किंवा लॉरी, १५.१% कार आणि ३.०% बसेसचे होते.
रस्ते अपघाताची प्रमुख कारणे
• मद्यपानाच्या प्रभावाखाली वाहन चालवणे (drink and drive)
• अतिवेगाने वाहन चालवणे (overspeeding)
• धोकादायक आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंग आणि ओव्हरटेकिंग करणे.
हे सगळ्या कारणामुळे रोड एक्सीडेंट से स्तर वाढले आहे त्याला कमी करण्यासाठी लोकामधे “रोड सेफ्टी” बदल जागरूकता पसरली पाहिजे. हे सगळं करण्यासाठी कॉलेज रा.से.यो.विभागाने “एक डिफेंसिव ड्राइविंग चा ट्रेनिंग कार्यशाळा” आयोजीत केली. त्या मधे सगळ्या विद्यार्थिना रोड सेफ्टी बदल माहिती दिली गेली.या कार्यशाळेत माहीती दिल्यानंतर प्रमुख पाहूणे राजकुमार हरिनखेडे यांनी “वाहतूकीचे नियम पाळा आपले सुंदर जीवन सांभाळा ,जीवन अधिक सुंदर जगण्याची जबाबदारी आपलीच आहे असा सुंदर संदेश आपल्या मनोगतात व्यक्त केला. तर वाहतूक नियत्रंक API संजय आत्राम यांनी ‘वाहतूकीचे नियम जर पाळले तर जीवन सुरक्षीत होवू शकते .आपला व दुसर्यांचा जीव धोक्यात न घालणे हीच मानवता होय’ असे प्रतिपादन केले. विद्यार्थी हा समाजाचा आरसा असतो तसेच कुटूंबातला महत्वाचा दुवा. आपले जीवन अधिक सुरक्षीत करण्याकरीता वाहतूकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. असे मत अध्यक्षीय भाषणातून डॉ.निलीमा दवणे यांनी व्यक्त केले. सुरक्षा सप्ताहाची माहीती दिल्यानंतर प्रश्नत्तेरी तासात विद्यार्थ्यानी अनेक प्रश्नाची उत्तरे दिली त्याबद्दल त्यांना बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.विकास जुनगरी यांनी केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.