राळेगाव तालुका आमसभेत कविता धुर्वे यांनी प्रशासनाला धरले धारेवर; रखडलेल्या कामांवरून ग्रामस्थ आक्रमक

प्रशासकीय पारदर्शकतेवर बोट ठेवताना कविता धुर्वे यांनी विचारले की, गावागावात होणाऱ्या ग्रामसभा केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आहेत का? “सभेला सरपंच किंवा महत्त्वाचे लोक उपस्थित नसतानाही ग्रामसेवक इतिवृत्त (प्रोसिडिंग) कसे काय लिहितात?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली.