यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागल्याने विद्यार्थी पालकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे प्रवेश क्षमताही उत्तीर्ण अपेक्षा अधिक आहे मात्र ९०% च्या पुढे असल्याने गुणवत्ता यादीत त्यांचाच नंबर लागेल मग आम्हीही चांगले मार्क मिळवून हव्या त्या कॉलेजमध्ये हव्या त्या शाखेसाठी प्रवेश मिळणार का अशी चिंता लागून राहिल्याचा सूर विद्यार्थ्यांमधून व्यक्त होऊ लागला आहे.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी मागीलवर्षी पासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असल्याने ज्या विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांना मात्र तेच कॉलेज मिळत नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात दिसून येत आहे.
सन २०२४ पर्यंत ११ विची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने होती त्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तीथे प्रवेश मिळत होता मात्र मागील वर्षीपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने मा दहावीच्या निकालामध्ये ९० % हून अधिक मिळविलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचे संख्या अधिक आहे यामुळे हवे ते महाविद्यालय शाखा मिळेल अशी चिंता ९० % च्या आत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना असल्याचे त्यांच्याशी संवाद साधताना दिसून येत आहेत
महाविद्यालये सारखीच कोणत्याही महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रम तोच असतो हवं तेच कॉलेज मिळवण्यासाठीचा हट्टास विद्यार्थ्यांनी करू नये आपण ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी कोणतेही महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पूर्ण करू शकता शिवाय महाविद्यालय शिवाय अन्य सुविधाही आहे त्याचा उपयोग कसा करून घेता येऊ शकतो असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून दिला जात आहे
आम्ही काय करायचं आम्ही अभ्यास चांगला केला आहे ८५ ते ८९ टक्के मिळवले आहेत पुढे काय करायचं हे गुरुजन पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन यासाठी ध्येय ठरवलेलं असतं अशावेळी गुणवत्ता यादीत ९०% च्या पुढील विद्यार्थ्यांची वर्णी लागली तरी आम्ही करायचं काय असा संवाद विद्यार्थ्यांकडून होऊ लागला आहे
